Wednesday, July 27, 2016

नवा मित्र सह्याद्री...

नमस्कार ... 

                           मी भटक्या .... नाव जरी वेगळं असलं तरी मी मुळात स्वभावाने भटक्या आहे ... मला भटकायला आवडत .. खूप भटकून नवनवीन ठिकाणांसोबतच नaवनवीन लोकांना  भेटायला आवडत .. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गातील नवं  नव्या घटनांचा साक्षिदार व्हायला आवडत ... त्यातूनच निर्माण झाला माझा ब्लॉग भटक्या... a Crazy Traveler मी आज या ब्लॉग ला सुरवात खरतोय खरं पण गेल्या अनेक दिवसांपासून मनात लिखाण सुरु केलं होत माझ्या प्रवासाचं ... आज ते लेखणीत उतरावतोय खास तुमच्या करीता ..... 

      २६ जानेवारी २०१६ देशाचा प्रजासत्ताक दिवस , सर्वांनाच सुट्टी असल्या मुले अचानक कुठे तरी सहलीला जायची तय्यारी सुरु झाली एक दिवस आधीच घरातून निघून कुठे तरी unplaned trip करावी असे प्लान सुरु झाले आणि या सहलीला enjoyable करण्याची न काळत जवाबदारी माझ्या खांद्यावर आली. मग काय मग … निघालो आम्ही सामनाची जमवाजमव करून गाडीत १ टेंट , एक लहानशी शेगडी आणि खुप सर हसू घेऊन ठाण्याहून इगतपुरीच्या दिशेने … जसे जसे मुंबई च्या दूर जाऊ लागलो तसतसा वातावरणातला गारवा वाढत होता . कसारा इगतपुरी करत करत आम्ही घोटी हून मुख्य्र रस्ता सोडला आणि मग लागलो भंडारदराच्या मार्गाला, काहीच दिवसापूर्वी कळसुबाई चा ट्रेक करायला आलो त्या वेळी मी या रस्त्यावर पहिल्यांदा आलो होतो आणि त्या नंतर आत्ताच. मंत्ल्या मानत ठरवले होते कि आपण भंडारदराच्या जवळ जाऊन राहावे . आणि अखेर केलेही तसेच भंडारदराच्या अलीकडे एका छोट्याश्या टेकडी वजा दगडावर आम्ही आमचा तेंत लावला आणि रात्री मुक्काम ठोकला . दुसर्या दिवशी सकाळच्या सुर्योदायासोबत आम्हाला एक नवे surprize मिळाले . फोन वरून सतत आमच्या या unplaned trip चा मागोवा घेणारा आमचा जिवलग मित्र निखिल थेट नागपूरहून तिथे अवतरला. त्याच्या येण्यानी सगळ्यांना इतका आनंद झाला कि शहरात कधीही न पाहता येणारा सूर्योदयही आम्ही मिस केला अर्थात पण त्या पेक्षा आनंद होता तो आपला मित्र आपल्याल भेटायला इतक्या दूर हून आल्यच. तो आल्याने मात्र एक बरे झाले … आमच्या unplaned trip ला जर प्लानिंग मिळाले … कारण त्याने त्याच्या मनात सगळे प्लान तयार ठेवले होते . तेहून आम्ही निघालो अजून पुढे असलेल्या समृद गाव कडे … आता आमचा मोरक्या निखिल झाला होता तो म्हणेल तिथे जायचे असे म्हणून आम्ही गाडी चालवत चालवत अनेक ठिकाणी थांबत थांबत समृद गावी पोहोचलो … एका छोट्याश्या झोपडी वजा घरात निखिल आम्हाला घेऊन गेला …. तिथला गरम गरम चहा दुपारी १२ वाजता सुद्धा वाजणाऱ्या त्या थंडीत खूप आल्हाद दायक ठरला. त्या घरातल्या काही मंडळी शी चार चा करून मग आम्ही पायवाट धरली ती सह्याद्रीच्या एका कपारी ची . थोडेसेच अंतर चालत गेल्यावर आमची अचानक ओळख झाली ती सांधण दरी शी . 

                  वर्षानुवर्षांपासून कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यानी तयार झाला एक ओढा… या ओढाचे पाणी उताराच्या दिशेने वाहत जाऊन सह्याद्रीतल्या एका भल्या मोठ्या दगडाला भेग पडून गेले आणि तयार झाली ती सांधण दरी. हि माझी सांधण शी पहिली भेट ! मला सहसा एकाच जागेवर वारंवार जायला आवडत नाही परंतु या दरीत प्रवेश करतांनाच मनाशी ठरवले इथे वारंवार यायचे …. आणि तसेच झाले …. त्या दिवसानंतर माझ्या बोलण्यात दिवसातून अनेक वेळा सांधण सांधण वर्णन ऐकून अनेक जन भारावून गेले । आणि आणि मग सुरु झाला तो प्रवास …. तो आज वर चालूच आहे … मग मित्र मैत्रीण नाते वाईक , एकदा तर चंद्रपूर जिल्ह्यातील १०- १२ परीक्षा झालेय चिमुकल्या मुलींचा सहस शिबीर घेतला तो याच संधान दरीत. ३ वर्षा पूर्वी नकळत का होईना मी ज्या मित्राला ट्रेकिंग ची आवड लावली त्याच मित्रांनी महाराष्ट्राचा ट्रेकिंग चा खजाना असलेल्या सांधण दरीशी माझी ओळख करून दिली आणि मी प्रेमात पडलो ते सांधण च्या आणि सह्याद्रीच्या …. हळू हळू सह्याद्रीचे हे पर्वत मित्र झालेत माझे । घोटी ते समृद या दीड तासाच्या रस्त्यातील अनेक पर्वतांकडे शांत पाने उभ राहून पाहिलं तर वाटतात कि हे दगड दगड नसून ते माणसा आहेत आणि ते गप्पा मारतायत माझ्याशी …। आणि त्यांच्या गप्पा ऐकत मी दगड सारखा उभा असतो. त्याच रस्त्यांनी येत्ताना सतत दिसणारा कळसुबाई चा शिखर, बलाढ्य शक्तींनी उभे असलेले अलंग, मदन , कुलंग गढ सगळेच कसे आपल्या स्वागत साठी सज्ज असतात. रस्त्यात लागणारा भंडारदरा आणि घात घर तलाव मुळात फक्त फोटो ची सुंदरता वाढावी म्हणूनच बनले आहेत कि काय असे वाटू लागते . मी सह्याद्री पहिला तो फक्त जानेवारी ते मे दरम्यानच आणि त्यातच मी भारावून गेलो .पहिला पाऊस  येण्या पूर्वी एकदा पुन्हा एक चक्कर टाकली या सह्याद्रीत ते नव्या मित्रांना भेटायला निसर्गातील नवे मित्र …. "काजवे" लह्नांपासून मोठ्यांपर्यंत काजवे पहिला आवडत नाही असे कोणी नाही . सह्याद्रीच्या कुशीत अनेक ठिकाणी पहिल्या पावसाच्या अगोदर हजारोच्या संखेत काजवे दिसतात म्हणे , मग मी पण गेलो  पुन्हा एकदा माझ्या नव्या मित्रांच्या जवळ त्यांच्याशी गप्पा मारत नव्या मित्रांशी ( काजव्यांशी ) मैत्री करायला . दिवसभर विविध साहसी खेळ, संधान दरी  ची आणखीन एक सफर , सायंकाळी घाटघर कोकण कड्यातून सूर्यास्त .. सगळ्यांनी पुन्हा एकदा मन भरवून गेलं , खर पण थकलं नाही मनात एक वेगळी ओढ होती ती काजवे बघण्याची ... संध्यकाळची रात्र झाली साम्रद गावातून आम्ही कूच केली ती जंगलात असलेल्या आमच्या कॅम्प साईट कडे ... गावाबाहेर पडलो आणि  जंगल सुरु झाले ... आणि ज्या क्षणा ची आतुरतेने वाट पाहत होतो ते काजवे आमच्या आजूबाजूला झाडांवर दिसू लागले .... एका वेळेस इतके काजवे दिसू शकतात आणि ते इतके मन मोहक असू हाकतात कधी विचारच नव्हता केला ... ख्रिसमस ट्री वर दिव्यांनी रोषणाई करो त्या प्रमाणे त्या घाटघर च्या लहानश्या जंगलाला कुणी तरी रोषणाई केली कि काय असा प्रश्न पडू लागला ... ती तशी रोषणाई मनात साठवून तिथून वापस आलो ... आणि सह्याद्री चे नवे रूप बघण्या साठी वाट पाहू लागलो ... 
                                  आता पावसाळा  येणार मला ओढ लागली ती पावसाळ्यातील सह्याद्रीच नाव रूप बघायची …. आज पहिला पाऊस येऊन साधारण महिना होऊन गेला पण याहून सह्याद्रीच हवं तस दर्शन घेतलं नाही ... रस्त्याने येत जाता लोणावळ्याच्या घाटातून दिसणारे धबधबे , कसारा घाटातील मन मोहक हिरवळ ... सगळंच माझी उत्सुकता वाढवत चालाय .... याच धर्तीवर येत्या रविवारी शिवाजी महाराजांच्या  मराठी राज्याची पहिली राजधानी असलेला राजगड .... ते  .. महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला  किल्ला तोरणा असा ट्रेक करणार आहे ... सह्याद्रीच्या या नव्या रुपाला नव्या नव्या भागाची ओळख करायला तुम्ही येणार का माझ्या सोबत ..??? 
घाटघर तलाव 
संधान दरी